Friday, 17 March 2017

19-07-2016               

             Of all the talks that are necessary, why do we always forget the one with our own selves? Of all the arguments that we put up, why do we fear to put up those, in ordr to preserve self-respect? Of all the people who are close and important to us, why do we always avoid the most important?...Guess who...
              Why is always that only when someone starts turning back to you makes you realise that they are no more interested in talking? Why are you not smart enough to acknowledge it before? To put it more bluntly, why do you need to be throwed down with saying that they are bored of you? Why can't you just read it off their face? Their gestures?...
               Life is an amazing journey. A journey in which the destination itself is the starting point. It is amazing to see how people who used to play to get into talk with you are the one who don't even have time to read out your views...Or perhaps: it is your mistake.
               " आपलाही कोणालातरी कंटाळा येऊ शकतो, ही जाणीव फार भयप्रद असते"
                                                                                                                      -व.पु.काळे
                 जेंव्हा एखाद्याला ही जाणीव होते तेंव्हा तो मुळापासून हलतो. The only thing that he doesn't understand is: why?...
                 But gradually he starts to understand...
                 The greatest mistake of a mystic? To reveal his mystery. The greatest mistake of a magician? To reveal his trick...Because he is valued only till he has the trick. When others know it, he is just an ordinary guy...
                 The world doesn't really value goodness. It needs something bad to compare with. There is an old witty sentence, you might have heard: "The problem about being punctual everytime is that there is no one present to appreciate it!"...Well...the same goes with other aspects. Sometimes you show so much understanding that people take it for granted. Sometimes you open yourself so much that people forget that it is by your choice that you are doing that. Sometimes you keep yourself so much away from using power, you keep yourself so much friendly that people start to mistake it as your inability or weakness.
                      One might be fooled into believing that being open about everything is a higher moral value. A mystic might think that sharing his secret with the world, the world will be happy.
                   But is it so?
                   A magician revealing his trick becomes an ordinary man, just like others. Does his magic trick makes everyone else magician?...Of course not!
                   Keeping secrets, perhaps, is not that bad thing, as we might think. Or, let me just put into a better way: I am always an open book. You have each chapter, each line to read, again and again. But there is also a skill called 'reading between the lines'. You need to have that. Or else, you will know me by heart but not by heart...
                    Anyway, it feels nice to write again, after a long time. All the reasons that i keep giving for not writing are all full of bullshit (as you might have sensed already!).

                    Hope to keep writing more frequently. Sometimes a bit serious, sometimes a bit light. Sometimes, randomly philosophical. I can't guarantee it to be good or better in any sense nut i can add just one more thing to back it up...more life in it!
15-07-2015  

कॉलेजचा पहिलाच दिवस...late admission...त्यामुळे मनात थोडीशी भीती...त्यातच उशीर झालेला. ५-१० मिनिटं उशिराच वर्गात पोहोचलो. ७:१० चं lecture होतं. वर्ग बऱ्यापैकी भरला होतं. एक कोणीतरी सर शिकवत होता. ('तो' सर म्हणण्याचं कारण एवढंच की तो तरुण वाटत होता. त्यामुळे एकेरीवर उतरलो असलो तरी हेतू अपमान करण्याचा नसून कौतुक करण्याचाच आहे.) तर तो एक कोणीतरी सर शिकवत होता. मी चूप-चाप शेवटच्या बाकावर जाऊन बसलो आणि काय चाललंय ते ऐकायचा प्रयत्न करायला लागलो.५-१० मिनिटं झाली असतील, अचानक मला काहीतरी click झालं. मी शेजारच्या बाकावरच्या मुलीला हळूच विचारलं- 
                           "Is this class for SYBA?" 
ती म्हणाली- 
                           "No! This is FYBA." 
-                         "Oh!", मी. 
                    तिच्या आजूबाजूच्या चार मुली माझ्याकडे विचित्र नजरेनी बघत हसायला लागल्या. (अशावेळी 'त्या' हसण्याचं काहीच वाटत नाही.) मी उठलो आणि बाहेर जायला लागलो. तो सर बावचळला. त्याला कळेना, हा मुलगा अचानक उठून जायला का लागला. त्यानी मला थांबवलं, विचारलं- 
                            "What happened?" 
मी-                       "Sir, I am in wrong class!" 
                    त्यानी थोड्यावेळ माझ्याकडे विस्फारून पाहिलं मग मोठ्ठा श्वास घेऊन म्हणाला - 
                            " Oh! Happy Realisation!" 
                    सगळा वर्ग हसायला लागला. तो सर हसायला लागला आणि मीही हसायला लागलो आणि 'माझा' वर्ग शोधायला बाहेर पडलो. १५-२० मिनिटं तो वर्ग सापडण्यातच गेली. दरम्यान मी खालच्या मजल्यावरून वरच्या मजल्यावर, ह्या corridor मधून त्या corridor मध्ये अशा २-४ चकरा मारल्या. 
                    "Is this class for SYBA?", हा प्रश्न विचारून सगळ्या वर्गात सकाळी-सकाळी थोडा-थोडा हशा पिकवून आलो. मी corridor मधून ये-जा करताना त्या वर्गामधली पोरं माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेनी पाहायला लागली. काहींच्या चेहऱ्यावर तर मला- "सापडला की नाही?" , या अर्थाचं काळजीयुक्त हसू दिसलं. शेवटी तो वर्ग सापडला आणि माझा college सुरु झालं. 
                     नंतर असाच एका वर्गात बसलो होतो. मला off होता. सगळी पोरं आपापल्यात गुंतली होती आणि मी नवीन smartphone मध्ये...अचानक एक madam आत घुसल्या. (आता आदरार्थी उच्चार केला म्हणजे त्या तरुण नव्हत्या असा अर्थ सुज्ञ वाचकाने मुळीच घेऊ नये. यावेळी मी 'वय' सोडून 'सुंदरता' हा criterion वापरला. हे अशी partiality का, हे पुढे कळेलच.) 
                      मी मागच्या अनुभवाने शहाणा झालेला. मी लगेच एका मुलीला विचारलं- 
                             "Which class is this?" 
ती-                        "English Literature" 
                       बापरे! मी तडक बाहेर निघालो. माझा विषय नव्हता. पुन्हा त्या madam बावचळल्या. पुन्हा त्यांनी विचारलं काय झालं आणि मी पुन्हा तीच जुनी स्टोरी repeat केली की मी new admission  आहे, मला अजून काही माहित नाही blah blah blah... 
                        त्या madam ला काय वाटलं काय माहीत, पण त्या म्हणाल्या- 
                               "Now,you will have punishment. You will sit for this lecture!" 
                        माझा चेहरा पडला आणि सगळ्या पोरांना आसुरी आनंद झाला - "कर सहन आता तू पण...!" type चा. मी उगाचच हसलो आणि मागे जाऊन बसलो. पुढचा बराच वेळ मी आळस देत, जांभया देत त्यांना सांगायचा प्रयत्न करत होतो की, तुम्ही मला खूप बोअर करताय, मला जाऊ द्या. पण madam बधल्या नाहीत. त्यांनी चक्क दुर्लक्ष केलं. Meanwhile, मी English Literature हा विषय घेतला नाही हे खूप चांगलं केलं, हे एक "Happy Realisation" मला झालं. 
                        Lecture संपलं. त्या madam नी मुद्दामहूनच मला सगळ्यांसमोर विचारलं- 
                               "So, how did you find this class?" 
                        मी तर तयारीतच होतो. मी म्हणालो- 
                               "Well mam, I must say, you have punished me very hard!" 
                        आता madam चा चेहरा पडला आणि सगळ्या वर्गाला पुन्हा आसुरी आनंद झाला - "तूच रे भावा तूच..." type चा... 
                        पहिला दिवस एकुणात वेगळाच गेला. सगळं नवीन असल्यामुळे थोडी उत्सुकता, थोडी भीती यांचं mixture मनात आहे. त्यातून पुढे कदाचित असेच काही किस्से घडतीलही. 
                        शहर सोडायचं म्हणजे काहीशी सरळ कल्पना माझ्या डोक्यात होती. कपडे घ्यायचे, काही महत्वाचं सामान घ्यायचं, bag उचलायची आणि निघायचं...फार काही लांब जात नसल्यामुळे काही राहिलंच तर ते आणायला परत यायचं, एवढी साधी कल्पना. पण ते इतकं सरळ नाहीये हे हळू-हळू लक्षात आलं. कपडे, सामान यासोबत काही स्वप्नंही घेऊन निघालोय. आणि त्याबरोबर काही अर्धवट राहिलेले plans, कधीतरी बेसावध क्षणी दिलेली promises, काही अपूर्ण राहिलेल्या गप्पा...हे सगळं मागे सोडून चाललोय. 
                         तसा काही फार लांब चाललो नाहीये, पण तरी लग्न करून सासरी जाणाऱ्या मुलीच्या feelings चा अंदाज येतोय. म्हणजे जिथे चाललोय ते आपलंच आहे, आपल्यासाठीच आहे आणि खूप चांगलं आहे, पण जिथून निघतोय, ते सोडणं जिवावर येतंच ना? 
                         कोणाला काही आवर्जून सांगितलं नव्हतं कारण मनात हा विचार होतं की - 'असा कितीसा फरक पडणार आहे?'...पण गेल्या २-३ दिवसात लोक असे काही वागले की स्वतःलाच स्वतःची लाज वाटायला लागली. एकाने मी न जाणं किती महत्वाचं आहे हे पटवून दिलं. एकीने- 'कोणाला किती फरक पडतो, हे तू ठरवायचं नाहीस' , अशी शिव्या घालून सक्त ताकीद दिली. एकीने शेवटच्या क्षणापर्यंत रडवलं आणि मग हसून पाठवलं. आणि एकाने मनापासून लिहिलेला emotional असा message पाठवला. 
                         खरंतर या सगळ्याची सवय नाहीये. किंवा हे एवढं सगळं मिळेल की नाही अशी भीती मनात होती, त्यामुळे सगळंच टाळत होतो...पण मिळालं...आणि इतकं मिळालं की आता त्यात पार बुडून गेलोय. आणि आता त्याच्यातच बुडून रहावसं वाटतंय. इतके लाड करून घ्यायला कोणाला आवडणार नाही? 
                         कधी-कधी वाटतं, ह्या सगळ्याला काय अर्थय? सगळं किती क्षणिक, खोटं-खोटं आहे? पण मन मानायला तयार होत नाही. खऱ्यामध्ये जसं थोडंसं खोटं असतंच, तसं मग खोट्यामध्ये पण खरं असेलच ना? आणि जाऊ दे ना...एक गोष्ट शिकलोय ती म्हणजे जेंव्हा मिळतं,तेंव्हा गप्पं बसावं, आणि घेत रहावं...because it is god's gift!!! 
                         अजून बऱ्याच जणांना भेटायचंय, बऱ्याच जणांशी बोलायचंय. पुन्हा काहीजण शिव्या घालतील, पुढे होऊन मिठ्या मारतील, काहींशी चर्चा झडतील, काहींशी गप्पा रंगतील. पाय थोडासा इकडेच अडकून राहील. 
                        पण राहू दे! आकाशात उडायला झेपावताना जमिनीची ओढ लागून राहते, याहून चांगलं काय? ती ओढ अशीच रहावी आणि हे प्रेम असंच मिळत रहावं, ही प्रार्थना! 
                        आता हे संपवू कसं कळत नाही. खूपच emotional झालं. एखादा joke लिहिला असता पण तेही फार typical वाटेल. असो! पण typical वागण्यामध्येही कधी-कधी किती मजा असते, हे आता कळायला लागलंय...आणखी काय सांगू?... 
                     
17-05-2015

"आता काहीतरी लिहूया...", असं म्हणून मी तासन-तास समोरच्या कोऱ्या पानाकडे बघत बसतो. आणि guess what ते पानंही माझ्याकडे blankly तासन-तास बघत बसतं...काही नाही, फक्त शांतता...वरती ३ च्या स्पीडनी फिरणाऱ्या fanचा आवाज...डाव्या बाजूला वर लाईट आणि उजव्या बाजूला माझीच shadow . मग पुन्हा हातामध्ये पेन खूप वेळ तसंच उघडं आणि मनामध्ये...मनामध्ये कमालीची शांतता...
"This is something new, isn't it ?", i ask myself. म्हणजे इतके दिवस मनात कमालीचा गोंधळ असायचा आणि लिहिताना सगळं शांत व्हायचं . आता आतमध्येच सगळं शांत आहे. ना कुठले प्रश्न, ना कुठली उत्तरं. किंवा असतीलही पण प्रश्न आणि उत्तर यातला फरक आता जाणवेनासा झालाय.
It has been quite a journey. १०वी मध्ये अचानकपणे लिहायला सुरुवात केली. का? कशासाठी? I still don't understand...but the journey was magical. जे काही छोटे १४-१५ लेख लिहिले आणि facebook वर post केले, ते आता स्वतःलाच नवीन वाटतात आणि खरं सांगायचं तर बऱ्याचदा बालीशही...Then a voice inside my head says-"Journey वगैरे म्हणण्या इतकं असं कितीसं लिहिलंयस? १४-१५ छोटे-छोटे लेख, ते पण कुठे publish झालेत असं नाही. आणि direct 'journey '?" ...But why not? I ask myself, why not? तू कशासाठी लिहिलंस? Publish होण्यासाठी? likes मिळवण्यासाठी? Recognition मिळवण्यासाठी?...नाही...पण हे सगळं नको होतं, नको आहे, असंही नाही.
-“मग हवंय काय?”
-“माहित नाही! I don 't know!”
मित्रांनी दिलेल्या या वहीची जेमतेम ६-७ पानं भरलीयेत आणि तू इतक्यात journey वगैरे बोलतोयस. म्हणजे आता लेखन वगैरे संपलं की काय आयुष्यातलं? म्हणजे ही उरलेली शे-दीडशे पान कोरीच राहणार की काय?
पण केवळ पानं कोरी राहू नयेत, म्हणून लिहायचं? म्हणजे मग कोणालातरी आपण सांगायला मोकळे-“एक वही भरून लिहिलंय आत्तापर्यंत..." Anyways ...People will laugh . हजार-हजार पानं लिहिणारे आहेत, त्यांच्यात तू कुठे?...पण हा प्रश्न- “किती लिहिलं, यापेक्षा काय लिहिलं हे महत्वाचं नाही का? आणि तसंही मला कुठे मी लिहिलेलं शाळेच्या पुस्तकात धडा म्हणून छापून यावं असं वाटतं?
‘किती?’ आणि ‘काय?’ यातला फरक आता समजायला हवा तुला...आता ही कोरी पानं भरवायची म्हणून भरवशील, मग नवीन वही, नवीन कोरी पानं, पुन्हा ती भरवण्यासाठी खटपट...शेवटी वह्यांचे गठ्ठे जमत जातील फक्त...आणि याचपासून लांब जाण्याची धडपड चालू आहे ना? ‘फक्त भरवण्यासाठी’, ‘फक्त सांगण्यासाठी की बाबांनो मी लिहिलंय!’. सगळं फक्त दाखवण्यासाठी so that त्यानी स्वतःचा ego झाकला जाईल आणि इतरांचे प्रश्न...
“बाबा रे, १०वील ९७% मिळवले, reputed college ला admission घेतली...बाबा रे १२वीत खूप कष्टानी अभ्यास केला,पुन्हा मार्क्स मिळवले...बाबा रे नोकरी पण केली, family ला support केलं, आदर्श मुलाचा role छान पार पडला...बाबा रे, लग्नही केलं, दोन पोरांना जन्मही दिला, त्यांच्यावर आपल्या धर्माचे, आपल्या संस्कृतीचा अभिमान वाटावा असे ४ संस्कारही केले...बाबा रे स्वतःसाठी खूप केलं म्हणून ‘समाजासाठी’सुद्धा थोडं केलं...आणि हे सगळं करून बाबा रे, एक दिवस मेलो!”
सगळं ठरवून...सगळं दाखवण्यासाठी...’हे केलं-ते केलं’...फक्त कुठल्या box वर tick -mark करायची राहून जाऊ नये म्हणून...सगळं काही ती कोरी पानं भरवण्यासाठी. केवळ आपली पानं कोरीच राहतील या भीतीने...
शेजारी जो वह्यांचा गठ्ठा जमत चाललाय, तो एकदा उचल आणि चाळ त्यातली पानं. आणि मांड हिशोब. किती पानं स्वतःहून भरली आणि किती तू भरवायची म्हणून भरवलीस...तू मेल्यावर तुझ्या ‘वह्यांचा’ गठ्ठा वाचायलाही कोणाला वेळ नाही. कुणीतरी तो गठ्ठा उचलेल आणि सरळ रद्दीत विकून येईल...त्यातून त्यांचे ४-५ वडापाव निघतील.
पानं कोरी राहतील ही भीती सोडून दे. कितीही लिहायचं प्रयत्न केलास तरी काही पानं कोरी सुटणारच ना? निदान काही ओळी तरी? Don't worry, let it be. Let your story reveal itself...to you and to the world! आणि तसंही तुझ्या या स्टोरी ची सुरुवात तुला माहितीये आणि end ही. So just relax and enjoy the story...
-“म्हणजे काय करू? लिहिणं बंद करू?”
-“असं कधी म्हणालो मी?”
-“मग वर एवढं सगळं frustration काढलस ते काय म्हणून?”
-“माहित नाही. I don't know...आणि तसंही लिहिणं थांबवणं माझ्या हातात नाही कारण ते सुरु करणं माझ्या हातात नव्हतं. If it has started on its own, it will end on its own! It will just happen.
आयुष्यात काही गोष्टी अशा असतात ज्या सहज होऊन जातात, त्यासाठी आपल्याला कष्ट करावे लागत नाहीत. किंवा त्या गोष्टींसाठी कष्ट करावे लागत असतील तर कुठेतरी काहीतरी गंडतय. For ex. जन्म, भूक, तहान, शू-शी,...लेखन-कविता...प्रेम...तंद्री......मरण!
लिहिण्याची सुरुवात या प्रश्नापासून झाली- “Who am I ?”. आत्ताही तो प्रश्न आहेच. पण का माहित का? आता त्यातल्या प्रत्येक शब्दावरचं वजनच उतरलंय. त्या प्रश्नाचा seriousnessच हरवलाय.
-“Who are you?”, प्रश्न.
-“Hahahaha....!”, उत्तर.
यापेक्षा वेगळं उत्तर मलातरी सध्या सुचत नाही. असो!
08-03-2015

माझ्या प्रिय मैत्रीणीहो, 
(इथे मित्रांना मुद्दामहूनच वगळण्यात आलंय हे माझ्या 'सुज्ञ' मित्रांनी लक्षात घ्यावं तसंच 'प्रिय' हा शब्दही मुद्दामहूनच वापरण्यात आला आहे, हे माझ्या 'शंकेखोर' मित्रांनी लक्षात घ्यावं!) 
तर माझ्या 'प्रिय' 'मैत्रीणीहो', 
            महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! खरंतर मला हे असे days वगैरे साजरे करणं अजिबात पटत नाही आणि जमत तर त्याहूनही नाही (म्हणजे tie -day   etc etc.) माझ्या मते ज्या दिवसापासून आपल्याला 'महिला दिन' साजरा करण्याची गरज पडणार नाही, त्या दिवसापासून रोजच खऱ्या अर्थाने 'महिला दिन' साजरे होतील. पण तरीही मी हे सगळं लिहितो आहे ते माझ्या स्वतःकडून, माझ्या इतर 'सुज्ञ' आणि 'शंकेखोर' मित्रांकडून (म्हणजे मीच!) आणि तुमच्या इतर काही मित्रांकडून (म्हणजे पण मीच!!). 
             खरंतर असं विशेष बोलण्या-लिहिण्यासारखं काही नाही. पण या मूर्ख आणि बिनडोक जगामुळे काही चुकीच्या concepts  तुमच्या डोक्यात बसू शकतात. त्या तशा बसू नयेत, म्हणून ही सगळी खटपट. 
             No .1. तुम्ही कुठल्या type चे कपडे घालता त्यावरून आम्ही तुमचं character ठरवत नाही. आणि जे ठरवत असतील ते लोक अतिशय रद्दड आणि मंद आहेत हे लक्षात ठेवा. मुळात तुम्ही काय कपडे घालावेत किंवा काय घालू नयेत हे ठरवण्याचा हक्क फक्त तुम्हाला आहे. तुमच्याकडून मी काही शिकलो असीन तर ते हेच की सुंदर असणं किंवा सुंदर दिसणं यात काहीच चूक नाही. या 'सुंदर' दिसण्याचा काळेपणा-गोरेपणाशी काही संबंध नाही. (कधी-कधी असू शकतो.) तुम्ही सुंदर दिसता तर दिसता. तुम्ही सुंदर दिसण्यात तुमची काहीही चूक नाही तसंच आम्हाला तसं वाटण्यात आमचीही काही चूक नाही. किंबहुना सुंदर दिसण्याचा प्रयत्न करण्यातही काही चूक नाही. (अर्थात! कधी-कधी असे फसलेले प्रयत्न पाहताना, पाहणाऱ्याला खूप मनस्ताप होतो. तेवढं सांभाळा पोरींनो!) उलट तुमच्यामुळे माझ्यासारख्या लोकांना बरे कपडे घालण्याची, अधून-मधून केस विन्चारण्याची ,कधीतरी नखं कापण्याची इच्छा होत राहते. 
No .2 . Love ,break -up ,relationships वगैरे तत्सम गोष्टींबाबत आम्ही जेवढे 'छपरी' आहोत तेवढ्या तुम्हीपण आहात. आम्हाला जशा एकावेळी अनेक मुली 'भारी' वाटतात, आवडू शकतात त्याचप्रमाणे तुम्हालाही जाता-येता दिसणारा कुठलाही मुलगा 'भारी' वाटू शकतो. आम्ही जसे मुलींवर line मारण्याचा प्रयत्न करतो (व्यर्थ!) तसे प्रयत्न तुम्हीही करता (मुलांवर!) हे आम्हाला मान्य आहे.(पण नेमकं अशा बाबतीत माझ्यासारख्याला वाळीत टाकण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? याचं उत्तर द्या.) 
        तुम्ही अगदी आमच्यासारख्या नाही आहात पण आमच्याहून वेगळ्यापण नाही आहात. तुमच्यामागे गाडीवर बसताना आम्हालाही तेच वाटतं जे तुम्हाला आमच्या मागे बसताना वाटतं .(फक्त भीती थोडी जास्त वाटते. उगाचंच जीवाशी खेळ!) बसताना नेमकं किती अंतर ठेवून बसावं,हात कुठे ठेवावेत याबाबत confusion  तुमच्यासारखं आम्हालाही आहे. रात्री उशिरापर्यंत जागणे,messages ची वाट बघत बसणे आणि उगाचच selfie काढत राहणे अशा 'वाईट' सवयी आम्हाला तुमच्यामुळे लागल्या.(त्यामुळे तुम्ही फार भारी आहात असं वाटून घेऊ नका. कुछ भी करनेका लेकिन ego  नही hurt करनेका!) तुम्हाला जशी 'तुमच्या-तुमच्यात' gossips करायला आवडतात, तशीच आम्हालाही 'आमच्या-आमच्यात' gossips करायला आवडतात. फक्त आमच्या चर्चा तुमच्या एवढ्या secret रहात नाहीत.(आमच्या काही 'गद्दार' मित्रांमुळे! त्यांच्यावर आम्ही लवकरच कठोर action घेणार आहोत.) तुम्ही एखादा 'sex 'वाला joke मारलात, तरी काही फरक पडत नाही. त्यांनी तुमची decency वगैरे कमी होत नाही. 
        खरंतर तुम्ही काहीही केलंत तरी आम्हाला काही फरक पडत नाही (शेवटी ego  नाम की भी कोई चीज होती है?) तुम्हाला काही-काही गोष्टी share करायच्या नसतात, हे आम्हाला कळतं. कधी-कधी खूप काहीतरी बोलायचं असतं पण जमत नाही हेही कळतं. तुम्ही एखाद्याचा राग करता तो  मनापासून आणि एखाद्याला जीव लावता तेही मनापासून! 
         खरंतर हे सगळं लिहिलंच पाहिजे होतं असं काही नाही. पण प्रत्येक वेळी गोष्टी बोलता येत नाहीत.(नाहीतर एव्हाना 'सगळं' settle  झालं असतं.) पण आजूबाजूला अशा विचित्र घटना घडत असताना, तुम्हाला काही 'वेगळंच' तर नसेल ना वाटत?,असं वाटलं. फक्त एवढंच म्हणायचं होतं की आपण जे काही आहोत,जसे वागतो ते okay वागतो. कदाचित काही चुका होतही असतील. स्त्री-पुरुष समानतेवर बोलण्यात काहीच अर्थ नाही. कारण ते बोलण्याची वेळ येते, तेंव्हा त्याच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभं राहतं. तुम्हालाही चुकण्याचा तेवढाच अधिकार आहे जेवढा आम्हाला आहे आणि त्या सुधारायचाही तेवढाच अधिकार आहे, जेवढा आम्हाला आहे. आपण जे काही आहोत,जसे काही आहोत,जसे वागणार आहोत, ते आपण ठरवूया,आपण explore करूया आणि या 'मूर्ख' आणि 'बिनडोक' जगाला बाजूला ठेवूया. 
          बाकी एवढं formal होऊन "महिला दिनाच्या शुभेच्छा!" वगैरे दिल्या तर तुम्हीही मला formality  म्हणून party वगैरे द्या? आणि माझ्यासारख्या गरिबाला अधून-मधून तरी तुमच्या 'timepass' मध्ये घेत रहा. तेवढंच जरा श्रीमंत झाल्यासारखं वाटतं आणि आयुष्य मजेत जात राहतं. आणखी काय? 

                                                                                                                                                     
                                                                                                                                                           तुमचा 'असाच एक' मित्र 
                                                                                                                                                           (कसा ते तुम्ही ठरवा!) 
22-01-2015                             

                             आवारगी करता हूँ पर मै आवारा नहीं 
                             छोड़ा खुल्ला दिल को मगर खुद को बिगाड़ा नहीं 
                             ऐसे लगे तेरे बिना अब तो गुजारा नहीं 
                             किसीका भी होऊंगा न मै हुआ जो तुम्हारा नहीं 
                             तू ही तो है खयाल मेरा 
                             तू ही तो है करार मेरा 
                             झुटे नशे जहाँ में कभी 
                             तू ही तो है खुमार मेरा 

                             जिन्दा हूँ तुझ पे मर के 
                             भुला सब तुझ को पढ़ के 
                             कैसा है प्यार तेरा 
                             तू ही तो है खयाल मेरा 
                             तू ही तो है करार मेरा 
                             झुटे नशे जहाँ में कभी 
                             तू ही तो है खुमार मेरा 


                             वाह! There can not be more beautiful lines to start with. माझ्यासमोर ही एक अतिशय सुंदर वही उघडलेली आहे. तिचा स्पर्शच इतका जबरदस्त आहे की मी अजून तासन-तास कोऱ्या पानांवर हात फिरवत बसू शकतो. ह्याला इतका मस्त वास आहे की लिहिण्यापेक्षा सारखी नाकाजवळ न्यावीशी वाटते. Front page पासून शेवटपर्यंत या कोऱ्या वहीकडे बघत रहावं फक्त...गेले कित्येक दिवस ही मस्त वही मी जवळ घेऊन बसतोय, छातीशी कवटाळून झोपतोय...त्याला कारणही तसं special  आहे.  
                             गेल्या वाढदिवसाला मित्रांनी ही Extra-ordinary वही गिफ्ट म्हणून दिली. तेव्हापासून ती कप्यात तशीच पडून आहे. अधून -मधून जाता-येता तिचा feel घेत होतो एवढंच. काही दिवसांपूर्वी वाटलं-"'बस यार! आता काहीतरी लिहूया त्यात!" पण काय? कारण इतकी सुरेख वही तर त्यात लिहिला जाणारा content  ही सुरेखच हवा . मग हा 'सुरेख' content शोधायला लागलो. पण तो साला सापडलाच नाही. 
                             कित्येक दिवस नुसताच विचार करत होतो. ह्याच्यावर लिहू की त्याच्यावर? ही सुरुवात चांगली वाटेल की ती? नाही, नको, तो विषय खूपच बोरिंग वाटतोय. असं काहीतरी नवीन, मस्त विषयावर लिहूया. या Extra-ordinary वहीच्या Extra-ordinary start साठी विषयही तेवढाच Extra-ordinary नको का? खूप वेळ तो Extra ordinary विषय शोधला. पण तो साला सापडलाच नाही. 
                             मग वाटलं,घोडं इथेच कुठेतरी अडतंय. बहुतेक आपली लिहिण्याची इच्छाच नसावी, त्यामुळे हवा-तसा-छानसा विषय सुचत नाहीये. असं force करून लिहिणं जमणारच नाही. छे! जाऊ दे! नंतर पुन्हा कधीतरी लिहूया. आत्ता हा नाद सोडून देऊ. पण मग वहीची सुरुवात कधी करणार?  नंतर म्हणजे कधी? ही वही मिळूनच आता ७ महिने झाले. आता अजून वाट पाहत राहिलो तर पुढचा वाढदिवस उगवेल. एखाद-दुसरा जण तरी विचारेलच-"काय रे, काय लिहिलंस त्याच्यात,वाचायला तरी दे!" मग काय बोलणार?  नाही-नाही, पुन्हा एकदा प्रयत्न करू. आपल्याला हवा-तसा विषय अगदी जवळच आला असेल .खूप शोधलं साल्याला. पण तो साला सापडलाच नाही. 
                            मग या सुपीक डोक्यातून निघालेली एक idea .. 
                           -"असं करू...आत्ता त्यातल्या-त्यात जो विषय बरा वाटतोय त्यावर आधी एका वेगळ्या कागदावर लिहूया. लिहून झाल्यावर चांगलं वाटलं तर मग ते वहीत उतरवूया. आहे की नाही झकास idea ?" 
                           -पण मग त्या नवीन वहीत first time लिहिण्याची मजा काय? 
                           -"कोणाला कळणारे?' 
                           -"पण मग originality चं काय? मला तर माहित असणार की जे काही लिहीन, ते पहिल्यांदा त्या मस्त वहीत लिहिलं नव्हतं." 
                            च्यायला! आता झाले का वान्दे? आता असं करूया. पेन उचलूया आणि सरळ लिहायला लागूया. काहीतरी सुचेलंच...पण नाही सुचलं तर? किंवा सुरुवातीला सुचून मध्येच सुचणं बंद पडलं तर? पहिलाच लेख अर्धवट राहिला तर? अक्षर वाईट आलं तर? शुद्धलेखनाच्या चुका झाल्या तर? खाडा-खोड झाली तर? Imagine. नवीन,मस्त,सुंदर,extra-ordinary  वही आणि तिच्या पहिल्याच पानावर सर्रास खाडा -खोड ...अरे कुठे फेडशील ही पापं?...नरकात तरी जागा मिळेल का? 
                            आणि मग स्वतःवरच खूप हसू आलं. खूप-खूप-खूप हसू आलं. आणि एकदा स्वतःवर हसू आलं की मग दोन गोष्टी होतात. एक म्हणजे तुम्ही बिनदिक्कतपणे स्वतःला मूर्ख ठरवून मोकळे होता आणि दुसरं म्हणजे आता तुम्हाला कोणीही मूर्ख म्हणालं तरी तुम्हाला त्याचं वाईट न वाटता आणखी हसू येतं. बोनस हसू! 
                            मग शेवटी ठरलं- लिहूचया! होणाऱ्या चुकांना किती घाबरायचं? शेवट कसा होईल या भीतीनी सुरुवात किती दिवस टाळायची? आता ठरलं. जसं होईल तसं लिहूया. टुकार तर-टुकार! हां...पण एवढी सगळी philosophy मारली तरी साला 'तो' काही सापडलाच नाही हां! 
                            वाटलं,इतके दिवस इतरांवर फक्त टीका केली. हे कसं भंगार, हे कसं टुकार एवढंच लिहिलं. आता जरा 'positive ' लिहू. जरा स्तुती करू सगळ्यांची. तर धड ते सुद्धा जमेना. मग शेवटी patent विषय- 'आयुष्य'...पुन्हा स्वतःवर हसू...काय लिहिणारेस ? आयुष्याचा अर्थ? meaning of  life? hahaha ,nice ...इतकी पुस्तकं वाचलीस, गाणी ऐकलीस, लेख लिहिलेस...काही सापडलं का? 
                           -"घंटा!" 
                            कशाला उगाच थातूर-मातुर,चार-पाच जड वाक्यं टाकायची? त्यांनी थोडीच कधी meaning कळालंय ? Life has no meaning . Beyond meanings,there are feelings.But life is not even feelings.It doesn't have to mean anything. Because it is just a flow. Yes, may be,life is just a continuous flow...like a river? उगमापासून-समुद्रापर्यंत पाणी हे पाणीच असतं. आपण त्याला ओढा,नदी,झरा,समुद्र अशी नावं पाडली, किनाऱ्यावरून बघताना. पण आतमध्ये फक्त पाणीच आहे. Continuous,uniform...किनाऱ्यावरून पाण्याची खोली मोजू नकोस. आयुष्य न जगता त्याचा अर्थ शोधू नकोस.किनारा सोड आणि पाण्यात उतर . हे अर्थ-बिर्थ सगळं बाहेरच्यांसाठी, आतल्यांना त्याची फिकीरच नाही. 
                             मग काय? पेन घेतलं,वहीचं पहिलं पान उघडलं...आणि किनारा सोडला...एक मस्त गाणं चालू होतं...त्याच्याच शब्दांनी सुरुवात केली.त्यात ते romantic निघालं (romance तो अपने अंदर कूट-कूट के भरा है!). 
                            extra-ordinary विषय मिळाला का? माहित नाही. extra -ordinary वहीची सुरुवात extra -ordinary झाली का? माहित नाही. आणि खरं सांगायचं तर आता त्याची फिकीर नाही. 
                             -"कारण?" 
                             -"आतल्यांना त्याची फिकीरच नाही!" 
03-01-2015                  

                               Have you ever reached where you had stared? If not, then it is pretty hard for me to explain what i am feeling. Have you ever got inspired by something so much that you have ended up following it blindly? Have you then, hated the same thing and yourself for doing so? 
                                       Things are always complex enough to challenge you to solve them. And then you dive deep into them in a hope to find an answer. And WOW! You even get an answer which is:...the same thing you were looking at...a bit simplified may be...but then what was the point in doing all that? 
                                       तुमच्या आयुष्यात तुम्ही कधी totally  confuse झालाय का? इतकं की कुठल्याच गोष्टीबद्दल 'हे असं का?' किंवा 'हे असं का नाही?' याचं काहीच उत्तर देता येत नाही. अशावेळी भयानक tension तयार होतं. There is no way to come out कारण तुम्ही नक्की कुठे अडकलाय हेच कळत नाही. 
                                       "Relax! ह्याच्यातून तू लवकरच बाहेर पडशील!" 
                                     -"अरे कशातून? मी कशात अडकलोय? आणि 'लवकरच' म्हणजे?" 
                                       ज्या प्रश्नांची उत्तरं शोधत होतो ते अचानक नाहीसे होतात आणि त्यांची उत्तरं पटकन समोर येतात. उत्तरं म्हणून नाही तर नवीन प्रश्न म्हणून...what the hell
                                       "जर का पहिला पडलेला प्रश्न सापडला तर? तर...तर मी तो ignore करून पुढे जाईन...The road not taken...blah blah blah...the road taken...blah blah blah...please, i don't want to walk anymore...the moment i have stared walking everything has changed..." 
                                       ज्या goal साठी चालणं सुरु केलं तो goal तर केंव्हाच हरवलाय...आता मी फक्त चालतोय...काहीतरी शोधतोय. काय? रस्ता? का नवीन goal
                                       रोज सकाळी उठल्यावर,i am totally clueless about everything. आजच्या दिवशी काय घडणारे? आज काही घडणारे का? म्हणजे तुला काही घडायला हवंय का? काय घडायला हवंय? 
                                     -"Stop ! Don't think so much! you will ruin everything ...Don 't you want to get enlightened?" 
                                      Enlightenment...now i feel this whole enlightenment business is shit! 
                                      "बस! शांत हो! God will help!" 
                                     -"God? देव? देव आहे का? देव म्हणजे काय?" 
                                     -Shut up!...Just shut up!" 
                                       I wan't no answers. I wan't no questions. I wan't nothing...wait...म्हणजे तुला अजूनही काहीतरी हवंच आहे तर. You want...'nothing'... 
                                       See, मला exactly हेच म्हणायचं. 
                                      Have you ever reached where you had started? If not, then it is really hard for me to explain what i am feeling...because feelings can't be explained and explainations can't be felt! 
01-11-2014

 The greatest fear one can ever have is the fear to be alone. आपल्या सगळ्यांच्या मनात एकंच भीती आहे. एकटं पडण्याची- एकटं असण्याची. जन्माला येतो एकटेच आणि मरतो ते सुद्धा एकटेच. मधलं आयुष्य म्हणजे फक्त आपल्याबरोबर कोणीतरी आहे हे स्वतःला भासवण्याचा खेळ. 
                      We always believe that we are making our own choices. But to make a choice you must have an option to choose from. अचानक एक दिवस डोळे उघडतात आणि एक गोष्ट स्पष्टपणे जाणवते- You never did make any choice. तुम्ही कधीच कुठला निर्णय घेतला नाहीत. तुम्हाला तो निर्णय तुमच्या एकटं पडण्याच्या भीतीने घ्यायला लावला. तुम्ही फक्त एकंच गोष्ट केलीत, त्याला छानसं असं कारण शोधलंत. 
                      आपण त्यातल्या त्यात safer करिअर निवडतो,जे socially acceptable असतं. आणि म्हणतो - आधी settle होऊया, पैसे कमवूया. स्वतःला जे करायचंय - वेगळं ,भारी- ते सगळं करण्यासाठी त्यानंतर आयुष्य पडलंय. आणि आपल्याला वाटतं we have  made  a  smart  choice . And we go on deciving ourselves. खरंतर आपण घाबरलेलो असतो race हरण्याला. आपण घाबरलेलो असतो status  हरवण्याला आणि त्यातून एकटं पडण्याला. 
                     We become possesive in our so called relationships. Because we fear loosing the other person and being left alone. But the thing is: you can't have anyone. No-one can be yours. Only you can be yours. And then we go on creating illusions to feel better. This is my friend circle. They are with me and I am with them...Groups,नाती,relationships समाज,कुटुंब यात आपण स्वतःला विसरायला बघतो. They are all illusions we have created to cover our alone-ness. Yes,alone-ness and not loneliness.Because loneliness is a feeling and alone-ness is a state of mind. 
                      सतत कुणाच्यातरी जवळ असण्याचा आभास. whatsapp ,texting ,facebook...we all know it! आणि ज्यांना यात सुद्धा हरवता येत नाही ते मग व्यसनातून स्वतःला unconcious करून घेतात आणि लांब पळतात. सिगरेट,दारू,ड्रग्स आणि ओढून-ताणून केलेली भक्ती...सगळीच व्यसनं. कुठल्यातरी अमुक तमुक स्वामी किंवा महाराजांच्या पायाशी झोकून दिलं की पुन्हा कोणाच्यातरी छत्राखाली safe  असण्याचा आभास. समाजाच्या दृष्टीने ते कदाचित फार चांगलं असेल पण ultimately  दारू काय किंवा हे काय, आपण स्वतःला सगळ्या परिस्थिती पासून लांब नेण्याचा प्रयत्न करतोय, unconcious करण्याचा प्रयत्न करतोय. पण एक गोष्ट राहतेच....ती म्हणजे मृत्यूचा क्षण. तो प्रत्येकाला स्वतःलाच face करायचाय. त्या वेळी या भीतीपासून कुठे पळून जाणार? आणि म्हणूनच कदाचित आपण घाबरतो मृत्यूला.  Because we know : we can't escape it. 
                   The real courage lies in facing the fear. आपल्याला एकटं  राहता आलं पाहिजे. If we can become totally alone,only then can we become totally together.कारण जर तुम्ही कधीच संपूर्णपणे वेगळे नसाल तर संपूर्णपणे एकत्र तरी कसे येणार?  कुठल्यातरी एका फिल्म मधलं वाक्य आहे- " Happiness only true when shared". मला वाटतं, Happiness only true when shared with ourselves. 
                    असं अजिबात म्हणायचं नाहीये की मैत्री,प्रेम,नाती या सगळ्या गोष्टींना काहीच अर्थ नाहीये. उलट या सगळ्या गोष्टींनाच खरा अर्थ आहे. पण यामुळे आपला आनंद इतरांवर depend राहायला लागला तर काय उपयोग? कधीतरी ते संपेल आणि आनंदही निघून जाईल. हेच सगळं जर स्वतःमध्येच मिळवता आलं तर? तर मग इतरांकडून मिळणाऱ्या गोष्टी म्हणजे आयुष्याकडून मिळणारी गिफ्ट्स असतील. 
                   This may sound weird,it might be harsh,it might be baseless,it might be depressing...it might be nothing...but you see-it might be true! 
                   आयुष्याचा महोत्सवच करायचा झाला, तर हाही एक मार्ग असू शकतो!!!